27 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे चक्काजाम आंदोलन...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. विदेशी बनावटीचे पिस्टल बाळगणारा अटकेत.
2. संचारबंदीच्या विरोधात व्यापाऱ्यांनी व भाजप आमदारानी निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेऊन केली चर्चा.
अकोल्यात जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात वाढविलेल्या संचारबंदीच्या विरोधात व्यापारी संघटना आणि भाजप आमदारांनी आज निवासी उपजिल्हाधिकारी यांची भेट घेतली. संचारबंदी वाढविल्यापेक्षा दुकाने जास्तवेळ उघडी ठेवण्यास परवानगी दिली तर कोरोना संसर्ग कमी होईल.तसेच व्यापाऱ्यांचे ही आर्थिक नुकसान होणार नाही,अशी मागणी त्यांनी यावेळी केली. कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.
3. पाचोरा तालुक्यातील घटना
4. संत रविदास महाराज यांच्या जयंती
5. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार शेतकरी संघटनेच्या नेत्यांचा आरोप
चोपडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत 25 तारखेला हरभरा मोजणी दरम्यान राडा झाला असून सदर शेतकऱ्याचा हरभरा व्यापाऱ्याने सहा हजार तीनशे रुपये भावाने खरेदी केला व हरभराचे जवळपास 90 टक्के मोजणी सुद्धा झाली असताना व शेवटी हरभरा थोडाफार मोजणीचा शिल्लक असतांना त्या मालाचा पुन्हा लिलाव करून भाव ठरविणार व नन्तर मोजणी करू असे व्यापाऱ्यांनी सांगितले या कारणावरून बाजार समितीच्या आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते .
6. चोपड्यात धरणगाव नाक्या जवळ भाजपाचे चक्काजाम आंदोलन
चोपडा - येथील भारतीय जनता पार्टीच्या सर्व आघाडीच्या वतीने पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्युची योग्य ती चौकशी व्हावी तसेच शिवसेनेचे नेते तथा वनमंत्री संजय राठोड यांच्या राजीनाम्या द्यावा म्हणून होत असलेल्या राज्यव्यापी चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा म्हणून शहरा जवळील धरणगाव नाक्यावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
7. ख्रिस गेलच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी टी-20 वर्ल्ड कपमध्ये गेलचे पुनरागम
वेस्ट इंडिजचा आक्रमक बॅट्समन आणि ‘युनिव्हर्सल बॉस’ म्हटले गेलेल्या ख्रिस गेलचा आगामी टी-20 क्रिकेट वर्ल्ड मध्ये समावेश करण्यात आला आहे. गेलनं वयाच्या 41 व्या वर्षी 18 महिन्यानंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. भारतामध्ये यावर्षी ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपची तयारी वेस्ट इंडिजनं सुरू केली आहे.
8. "मी भ्रष्ट नाही, त्यामुळेच भाजपावाले माझ्यावर दिवसभर टीका करतात"
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी तामिळनाडूमध्ये गेलेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज पुन्हा एकदा भाजपा आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले आहे तसेच मी भ्रष्ट नाही. त्यामुळेच भाजपा दिवसाचे २४ तास माझ्यावर टीका करत असतात, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला आहे.
9. पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी सांगितले 'कारण'
गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती सातत्याने वाढत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किमतीवरूनच विरोधक सरकारवर वारंवार हल्लाबोल करत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवरच पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मोठं विधान केलंय.
10. मराठीच्या मुद्द्यावरून भाजपचा आदित्य ठाकरेंवर घणाघाती आरोप
आपल्या राजकीय स्वार्थासाठी प्रत्येक वेळी मराठीचा वापर करणाऱ्या ठाकरे सरकारने 2021 च्या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत दिनदर्शिकेतून मराठी महिनेच वगळून टाकले असून, सोनिया सेनेला आता मरठी महिन्यांचा सुद्धा तिरस्कार होत आहे,' अशी विखारी टीका भाजपचे मुंबई प्रभारी व कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
27 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबींवर चर्चा; बैठक होण्याची शक्यता....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजप आक्रमक
पूजा चव्हाण आत्महत्येशी संबंधित संजय राठोड यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपचे राज्यभर आंदोलन सुरु केलं असून भाजप महिला मोर्चा या प्रश्वावर अधिक आक्रमक झाल्याचं पहायला मिळालंय. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांच्यावर कारवाई करावी यासाठी भाजपच्या महिला मोर्चाने मुलुंड टोल नाक्यावर चक्का जाम आंदोलन केलं.
5. अमरावतीत लॉकडाऊन वाढणार? कोरोना थांबेना
विदर्भातली कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यातल्या त्यात अमरावतीमध्ये कोरोना रुग्णांचं वाढणारं प्रमाण प्रशासनाची झोप उडवणारं आहे. अमरावती जिल्हात लॉकडाऊन असतानाही कोरोनाचा प्रकोप थांबण्याचं नाव घेत नाही.
6. तीव्र, अतितीव्र कुपोषणग्रस्त बालकांची वाढली संख्या
कोरोना काळात कुपोषणग्रस्त बालकांसाठी पोषण आहार व अमृत आहार योजना सक्षमपणे राबविण्याचा दावा केला जात आहे; परंतु त्यानंतरही तीव्र व अतितीव्र स्वरूपातील कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढली आहे.
गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 साधकांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महानुभव पंथाच्या वतीने फिरत्या सप्ताहाचे आयोजन करण्यात आलं होतं आणि साठ साधकांचा हा समूह जळगाव मध्ये काही दिवस राहून गेवराई तालुक्यातल्या कोल्हेर या ठिकाणी असलेल्या महानुभव पंथाच्या आश्रमात आले होते.
8. शरद पवार साहेबांची खूप आठवण येत आहे: चित्रा वाघ
मराठा आरक्षण आणि कायदेशीर बाबी यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
27 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - मुख्यमंत्र्यांकडून 'मराठी भाषा गौरव दिना'च्या शुभेच्छा...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
5. इंग्लंडला मोठा धक्का
पाहुण्या इंग्लंड संघाला तिसऱ्या कसोटीत लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागलाय.. अहमदाबाद कसोटीत टीम इंडियानं १० विकेट्स राखून दणदणीत विजय मिळवला आणि मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. या पराभवामुळे इंग्लंडचा आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमधून पत्ता कट झाला. त्यात त्यांना शनिवारी आणखी एक झटका बसला.
6. आर्थिक सेवा या विषयावर मोदींचे वेबिनार
करोनामुळे देशाची अर्थव्यवस्था घसरत असताना बँकांनी उद्योगांची कर्जाची गरज भागवावी, तसेच नवोद्योगांसाठी सुलभ आर्थिक साधने उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. खासगी क्षेत्राला पाठबळ देण्याचा सरकारचा प्रयत्न असला तरी सार्वजनिक क्षेत्राचे अस्तित्व बँकिंग व विमा क्षेत्रात गरिबांसाठी आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
7. क्रिकेट स्पर्धेसाठी चक्क मेंढा, बोकड, कोंबडय़ांची बक्षिसे
वाळवा तालुक्यातील एका मंडळाने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेतील विजेत्यांसाठी चक्क मेंढा, बोकड, देशी कोंबडय़ा, अंडी अशा बक्षिसांची घोषणा केली आहे. वाळवा तालुक्यातील बोरगावच्या साथीदार ग्रुपच्या वतीने क्रिकेट स्पर्धाचे आयोजन करण्यात आलं आहे.
8. अंबानींच्या बंगल्याबाहेर एक महिना रेकी
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर शस्त्रास्त्राने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाल्यानंतर पोलिसांनी कसून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी अंबानींच्या अँटालिया बंगल्याबाहेरचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मोर आली आहे.
9. चित्रा वाघ अडचणीत
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण चांगलेच लावून धरले आहे. प्रकरणात आवाज उठवणाऱ्या भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी संपत्ती असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लाच प्रकरणाच्या पार्श्वभूमीवरच 1 डिसेंबर 2006 ते 5 जुलै 2016 या सेवा कालावधीतील किशोर वाघ यांच्या संपत्तीची ACB कडून खुली चौकशीही लावण्यात आली होती.
10. कोरोनामुळे पिफ चित्रपट महोत्सव लांबणीवर
पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव म्हणजेच पिफ पुढे ढकलण्यात आला आहे. नव्या निर्णयानुसार 4 मार्चपासून सुरू होणाऱ्या चित्रपट महोत्सवाचे उद्धाटन 11 मार्चला होणार आहे. पिफ चित्रपट महोत्सव 11 ते 18 मार्च या कालावधीत असणार आहे.
सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स - कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार
News24सह्याद्री - कोरोना रुग्णसंख्येमुळे मुंबईतील आयपीएलच्या सामन्यांवर टांगती तलवार....पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
सह्याद्री टॉप २४ न्यूज - संशयास्पद गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती
News24सह्याद्री - संशयास्पद गाडी विक्रोळी इथून चोरी झाल्याची माहिती...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
26 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण
नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण.. अहमदाबाद मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल या जगातल्या सर्वोत मोठ्या स्टेडीअमच्या उद्घाटन समारंभात स्टेडीअमचे नामकरण नरेंद्र मोदी केल्यानंतर सर्व स्थरातून टिका होत असताना बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दलची खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिल्याची टीका केली आहे.
2. अकोला परिमंडळात ४८ तासात ३४० वीज चोरांवर कारवाई..17 लाखांची वीज चोरी
परिमंडळातील थकबाकी वसूलीचे आवाहन समोरअसतांना परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात वीज चोरीचा वाढलेला प्रकार महावितरणसाठी मोठे आव्हान ठरत आहे.त्यामुळे महावितरणने वीज अशा चोराविरूध्द एक्शन घेत वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या धाडीत परिमंडळात गेल्या ४८ तासात ३४० वीज चोरांवर कारवाई केली आहेय.यामध्ये थेट वीज चोरी किंवा मीटरमध्ये फेर फार करून वीज चोरी करणाऱ्यांची संख्या ही ३२६ आहे.
3. शिरपूर शहरात मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राबवायच्या उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रमसिंग बांदल यांच्या अध्यक्षतेखाखाली आढावा बैठक झाली.या बैठकीनंतर शिरपूर शहरातील दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध येण्याची शक्यता आहे. दरम्यान, शहरात मास्क न वापरणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
4. अकोल्याच्या दामिनी पथकाच्या प्रमुखपदी पीएसआय स्वाती इथापे.
महिला व मुलींच्या छेडखानीला पायबंद घालणे आणि प्रत्येक महिलेला भयमुक्त वातावरणात वावरता यावे, म्हणून पोलिस दलाने स्वतंत्र दामिनी पथक गठित केले आहेय. अकोल्यात या पथकाच्या प्रमुख पदी पोलिस उपनिरीक्षक स्वाती मधुकर इथापे यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केली आहे.
5. पाच दिवसांपासून कचरा संकुलात पडून,परिसरात पसरली दुर्गंधी !
डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड येथील बालाजी गार्डनमध्ये 9 सोसायट्या असून 522 सदनिका असून 2 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. दरवर्षाला 55 लाख रुपये कर भरुनही पालिका प्रशासन रहिवाशांना सहकार्य करीत नाही. सोसायटी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही.
6. पेट्रोलियम मंत्र्यांचं अजब विधान
इंधनाच्या वाढत्या दरांमुळे एकीकडे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना विरोधकांनीही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरलं आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी हिवाळ्यात मागणी वाढत असल्याने इंधनाचे दर वाढत असल्याचं वक्तव्य केलं आहे.
7. WHOने मानले नरेंद्र मोदींचे आभार
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेबेरियसस यांनी गुरुवारी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोट्या देशांना मदत करण्यासाठी आणि लस समानतेला समर्थन देण्यासाठी आभार मानले. त्यांनी अशी आशा व्यक्त केली की, इतर देशांनीही भारताच्या अनुसरण केले पाहिजे.
8. प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ;
केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. एका महिलेकडून रेल्वे पोलिसांकडून हा साठा जप्त केला असून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.
9. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचं वक्तव्य
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुनावलं आहे. दोन्ही नेत्यांनी केरळमध्ये आपल्या रॅलीदरम्यान डाव्या सरकारवर टीका केली होती. “वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केरळच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन असेल, पण डाव्यांबाबत त्यांची भावना मात्र समान आहे. याबाबीत त्यांचं एकमत आहे,” असं पिनराई विजयन यांनी म्हटलं आहे.
10. दैनंदिन प्रवाशांना, पासधारकांना प्रवेश नसल्याने संताप
मुंबई ते वलसाड दरम्यान धावणारी व हजारो दैनंदिन प्रवाशांचा आधार असणारी वलसाड फास्ट पॅसेंजर ही गाडी १ मार्चपासून पुन्हा सुरू करण्याचे पश्चिम रेल्वेने योजिले आहे. मात्र, ही गाडी पूर्णपणे आरक्षित राहणार असल्याचे घोषित केल्याने दैनंदिन प्रवाशांना तसेच पासधारकांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांत संताप व्यक्त होत आहे.
गॉसिप कल्ला - ऋतिक रोशन हाजीर हो, मुंबई क्राईम ब्रांचचं समन्स
News24सह्याद्री - ऋतिक रोशन हाजीर हो, मुंबई क्राईम ब्रांचचं समन्स.. पहा गॉसिप कल्ला मध्ये
1. अपर्णा पुरोहित यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
अॅमेझॉन प्राईमवर रिलीज झालेली वेब सीरिज ‘तांडव’ गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तांडव वेब सीरिजच्या समस्या काही कमी होण्याचे नाव घेताना दिसत नाहीत. अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या कंटेंट हेड अपर्णा पुरोहित नुकतीच लखनऊमध्ये आपले बयान नोंदवण्यासाठी गेल्या होत्या. मात्र ..
3. करीनाच्या बाळाला भेटायला पोहोचली सारा अली खान
बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांना दुसऱ्यांदा पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. करीना कपूरला ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये लॉकडाऊन दरम्यान करीनाने आई होणार असल्याची बातमी दिली होती.
4. किमोथेरपी सुरु असतानाच राखी सावंतच्या आईने मानले सलमानचे आभार
राखी सावंतची आई कॅन्सरशी झुंज देतेय. सध्या तिच्या आईवर किमोथेरपी सुरु आहे. काल राखीने आईचे फोटो शेअर केले होते. हे फोटो पाहून सगळ्यांना धक्का ...
5. राधिका आपटेचा बोल्ड ब्लॅक अँड व्हाइट फोटो होतोय व्हायरल
बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असते. तिचा कधी फोटो तर कधी व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. नुकताच तिने ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
26 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - “मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या”....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही
राज्यभर गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरुन भाजपाने आक्रमक भूमिका घेतली असून वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही असं भाजपाने स्पष्ट केलं आहे. राठोड यांचा राजीनामा नाही घेतला तर आम्ही अधिवेशन चालू देणार नाही, असं भाजप मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
2. “मुख्यमंत्री साहेब, नक्षलवादी होण्याची परवानगी द्या”
हिंगोलीमधील एका शेतकऱ्याने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिलं आहे. या पत्रामध्ये या तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे थेट नक्षलवादी होण्यासाठी परवानगी देण्याची मागणी केलीय. सेनगाव तालुक्यातील ताकातोडा गावाचे रहिवाशी असणाऱ्या नामदेव पतंगे या शेतकऱ्याने हे पत्र लिहीलं आहे. प्रशासन शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप या पत्रामध्ये पतंगे यांनी केलाय.
5. केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ
केरळमध्ये आज सकाळी प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रेल्वे प्रोटेक्शन टास्क फोर्सने जिलेटनच्या 100 पेक्षा जास्त कांड्या जप्त केल्या आहे. ही स्फोटक केरळच्या कोझिकोड रेल्वे स्थानकावर चेन्नई-मंगलपुरम या सुपरफास्ट ट्रेनमधून जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशीसाठी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
26 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - शेतकरी आता १०० रुपये लिटर दराने दूध विकणार...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
1. इंधन दरवाढ हे धर्मसंकट - अर्थमंत्री
महागाई मुळे सामन्यांच्या खिशाला दररोज कात्री लागत असताना गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेली इंधन दरवाढ आज देखील कायम आहे. काही शहरांमध्ये पेट्रोलने या आधीच शंभरी पार केली आहे. या विरोधात सामान्यांसह विरोधी पक्ष देखील आक्रमक होत आहेत.
2. हिंदुस्थान-पाकिस्तानमध्ये 'युद्धविराम'
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर नेहमीच कुरापती काढत गोळीबार करणाऱ्या पाकिस्तानने शस्त्रसंधीचे पालन करू असे पुन्हा आश्वासन दिले आहे. यासंदर्भात हिंदुस्थान आणि पाकिस्तानच्या लष्कराने संयुक्त निवेदन प्रसिद्ध केले आहे.दोन्ही देशांचे डायरेक्टर जनरल्स ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स यांच्यामध्ये हॉटलाइनवर चर्चा झाली.
3. स्फोटकं सापडल्याने मुंबईसह उपनगरांमध्ये हाय अलर्ट जारी
मुंबईतील हाय प्रोफाइल परिसरात स्फोटकं ठेवलेली गाडी साडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मुंबई शहरासह उपनगरांमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. तसंच बेवारस गाड्यांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नाकाबंदी करुन चोख सुरक्षा करण्याचे आदेशही पोलीस आयुक्तालयातून जारी करण्यात आले आहेत.
4. केरळमध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनवर स्फोटकं जप्त
रात्री मुंबईत स्फोटकं सापडल्याने खळबळ उडालेली असतानाच केरळमध्ये आज सकाळी कोझिकोड रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणावर स्फोटक सापडली आहेत. कोझिकोड स्टेशनवर चेन्नई-मंगळुरू सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये 117 जिलेटिन स्टिक आणि 350 डिटोनेटर सापडले आहे.
5. ग्राहकांना मिळणार घर खरेदीसाठी झटपट लोन
देशातील सर्वात मोठी बँक भारतीय स्टेट बँक आणि बांधकाम व्यावसायातील दिग्गज नाव शापूरजी पालोनजी रिअल एस्टेट यांच्या एक सामंजस्य करार करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी दोघांनीही सामंजस्य करार केला. या अंतर्गत शापूरजी पालोनजी यांची घरं खरेदी करणाऱ्यांना फायदा होणार आहे.
6. शेतकरी आता 100 रुपये लिटर दराने दूध विकणार
दिल्लीत सुरू असलेलं शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू असून, ते आणखी तीव्र करण्याचे प्रयत्न सुरू आहे. विरोध आणखी तीव्र व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी काही कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. शेतकऱ्यांच्या या निर्णयांचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार आहे.
7. ११ राज्यात कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट दाखवणं बंधनकारक
देशातील 9 राज्ये दोन केंद्रशासित प्रदेश मिळून अकरा राज्यात जाण्यासाठी कोरोना निगेटिव्ह रिपोर्टची सक्ती करण्यात आली आहे. दिल्ली सरकारनेही महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि पंजाबमधील प्रवाशांना दिल्लीत एन्ट्री करण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक केला आहे.
8. अॅमेझॉनवर बंदीची मागणी, 'कॅट'कडून आज भारत बंदचे आवाहन
देशभरातील व्यापार्यांची संघटना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स अर्थात कॅटकडून जीएसटीच्या नियमांच्या समीक्षेची मागणी करत आज भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर ताबडतोब बंदी लावण्याचीही मागणी व्यापार्यांकडून करण्यात आली आहे.
9. विधिमंडळाचे अधिवेशन 1 ते 10 मार्च, 8 मार्च रोजी अर्थसंकल्प
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत अधिवेशनाचा आटोपशीर कार्यक्रम ठरविण्यात आला. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 1 ते 10 मार्च चालणार असून प्रत्यक्ष कामकाज 8 दिवस चालणार आहे.
10. अहमदाबाद पिचबाबत रोहित शर्माची पहिली प्रतिक्रिया
भारतानं इंग्लंडचा 10 विकेटनं पराभव केल्यानंतर अहमदाबाद पिचवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. तिसरी टेस्ट फक्त दोन दिवसांमध्ये संपली. दुसऱ्या दिवशी तर तब्बल 17 विकेट्स पडल्या. त्यामुळे अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी अहमदाबादचं पिच खराब असल्याचं म्हंटलं आहे. या टेस्टमध्ये सर्वात जास्त रन करणारा भारताचा ओपनर रोहित शर्माला तसं वाटत नाही.
सह्याद्री गुड मॉर्निंग हेडलाईन्स - दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी लोकांना लस टोचणार
News24सह्याद्री - दुसऱ्या टप्प्यात २७ कोटी लोकांना लस टोचणार...पहा मॉर्निंग हेडलाईन्स मध्ये
26 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - व्याजाचे पैसे वसुलीसाठी कल्याणात बिहार पॅटर्न.....पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड येथील बालाजी गार्डनमध्ये 9 सोसायट्या असून 522 सदनिका असून 2 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. दरवर्षाला 55 लाख रुपये कर भरुनही पालिका प्रशासन रहिवाशांना सहकार्य करीत नाही. सोसायटी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही.
2. शाळा पुन्हा बंद ठेवण्याचे शिक्षण विभागाचे निर्देश
राज्यभरात एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. ही बाब लक्षात घेता स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार 1 मार्चपासून आवश्यकता भासल्यास व परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत काही काळ शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घ्यावा, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात येत असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
3. मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील 43 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण
दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी येथील मतिमंद मुलांच्या निवासी शाळेतील 43 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी ही माहिती दिली आहे. मतिमंद मुलांच्या या निवासी विद्यालयात जवळपास 69 जण शिकण्यासाठी आहेत.
4. महाराष्ट्र शासनाला संत नामदेवांचा विसर
देशाचे प्रमुख व आद्य क्रांतिकारी संत म्हणून ओळख असलेल्या संत नामदेवांचा राज्य सरकारला विसर पडल्याचं दिसतं. संत नामदेव यांच्या 750 वे जयंती वर्ष असतानाही महापुरुषांच्या शासकीय अभिवादन यादीत संत नामदेव महाराजांचे नाव नाही.
कोरोना काळात जास्त वीज बिल आल्याने ग्राहक त्रस्त आहे तर महावितरण उरलेल्या थकबाकीमुळे ते संकटात आहेत. अशा वेळी महावितरण सध्या वीज बिल वसुली करत आहे. यावरून राजकारण ही तापलं अस असलं तरी एक महावितरणचे कर्मचारी मात्र आपल्या कामात किती कर्तव्यदक्ष आहेत याचं उदाहरण समोर आले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकही चक्रावले आहे. वातावरणातील बदलांमुळे ताप, सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढले असून काही नागरिकांनी याची धास्ती घेतली आहे. लसीचा बाजार, विविध लॅब व इतर अर्थकारणाशी याचा संबंध जोडला जात आहे. याबाबत कुजबूज सुरू असतानाच मनसेने मात्र उघडपणे भूमिका घेतली आहे. 'मागील दोन अधिवेशनांपासून आम्ही लोकप्रतिनिधी हे बोलत होतो.
7. व्याजाचे पैसे वसुलीसाठी कल्याणात बिहार पॅटर्न, नगरसेवकावर गुन्हा दाखल
कल्याण-डोंबिवलीमध्ये पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित व्हावा असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्याजाने घेतलेल्या पैशांच्या वसुलीसाठी रिक्षाचालकाला भररस्त्यात फरफटत नेत, मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. डोंबिवली पूर्वेकडील टाटा पॉवर परिसरात ही घटना घडली आहे.
8. कोरोनाचा फायदा घेत लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेण्याचा धक्कादायक प्रयत्न
कोरोनाचं संकट पुन्हा एकदा गडद झालं असताना, नागपुरात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेत, स्वतःची तिजोरी काही स्वार्थी भरत आहेत. नागपूर शहरातल्या जुना सुभेदार ले-आऊट इथल्या एका क्लबवर महापौर दयाशंकर तिवारी यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांना सोबत घेऊन धाड टाकली. त्यावेळी 450 स्क्वेअर फूट खोलीत दीडशेहून जास्त लोकांनी गर्दी केलेली आढळून आलं.
9. इंधन दरवाढीविरोधात आज व्यापाऱ्यांचा भारत बंद
जीएसटीतील तूट भरून काढण्यासाठी डिझेल-पेट्रोलच्या वाढत्या किंमतींविरोधात आज भारत बंद पुकारण्यात आला आहे. या भारत बंदमध्ये सुमारे ८ कोटी छोटे व्यवसायिक सहभागी होतील. तसेच देशातील जवळपास १ कोटी वाहतूकदार आणि लघु उद्योग आणि महिला उद्योजकही यात सहभागी होणार असल्याचा दावा केला जात आहे.
10. पुणे जिल्ह्यात करोनाचे २१ हॉटस्पॉट; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले 'हे' आदेश
करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ससून रुग्णालयामध्ये खासगी एजन्सीकडून डॉक्टरांपासून ते वॉर्डबॉय पर्यंत मनुष्यबळाची व्यवस्था करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत. तसेच जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत.
सह्याद्री टॉप २४ न्यूज - वाघ असाल तर चित्राताईंसारखे व्हा; भाजपने शिवसेनेला डिवचलं
News24सह्याद्री - वाघ असाल तर चित्राताईंसारखे व्हा; भाजपने शिवसेनेला डिवचलं....पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
23 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिला इशारा..पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. आसमामध्ये एका सभेत बोलताना पंतप्रधान मोदींनी दिले संकेत
आगामी काळात आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ या चार राज्यांसह केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी येथील विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या तारखेची घोषणा मार्चच्या पहिल्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. कारण, खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तसे संकेत दिले आहेत.
2. गृहमंत्री अनिल देशमुखांनी दिला इशारा
लॉकडाउनसंदर्भात सोशल मीडियावर आलेला मेसेज फॉरवर्ड करत असाल, तर खबरदार… कारण लॉकडाउनबद्दलच्या मेसेजमुळे तुम्हाला पोलिसी कारवाईला सामोर जावं लागू शकतं. हो, हे खरं असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याबद्दल स्पष्ट इशारा दिला आहे. सोशल मीडियातून लॉकडाउन होणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं आहे. त्यामुळे सायबर सेलला लॉकडाउनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर नजर ठेवण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत.
3. ऑस्ट्रेलियातील वृत्तपत्रांचे पेजेस फेसबुकवर पुन्हा दिसणार
शुल्क आकारण्याच्या आपल्या नव्या कायद्यात सुधारणा करण्याची तयारी ऑस्ट्रेलिया सरकारने दर्शवल्यानंतर अखेर फेसबुकनेही नरमाईची भूमिका घेतली आहे. प्रस्तावित नवीन कायद्यानुसार, फेसबुक आणि गुगलला बातम्या दाखवण्यासाठी माध्यम कंपन्यांना पैसे द्यावे लागणार आहेत. या मीडिया लॉवरुन फेसबुकचा ऑस्ट्रेलिया सरकारशी संघर्ष सुरू आहे.
4. २६ जानेवारी हिंसाचार प्रकरणी २ प्रमुख आरोपींना अटक
२६ जानेवारी रोजी देशाची राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी २ प्रमुख आरोपींना अटक केली आहे. यामध्ये ४५ वर्षीय मोहिंदर सिंग आणि ३० वर्षीय मनदीप सिंग या दोघांचा समावेश आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार या दोघांना जम्मूमधून अटक करण्यात आली आहे.
5. जिनपिंग यांच्या भारत दौऱ्यामागे काय आहे कारण ?
पूर्व लडाख सीमेवरुन भारत-चीन संबंधात निर्माण झालेला तणाव आता हळूहळू कमी होत आहे. लडाखच्या अतिक्रमण केलेल्या काही भागांमधून चिनी सैन्याने माघार घेतली असली, तरी अजूनही हा वाद पूर्णपणे मिटलेला नाही. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चीनने ब्रिक्स परिषद भारतात आयोजित करण्याच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला आहे.
6. छाप्याच्या भीतीने साठा लपवत असताना स्फोट
कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिल्ह्यात मंगळवारी जिलेटिनच्या कांड्यांचा स्फोट होऊन भीषण दुर्घटना झाली आहे. यात सहा जणांचा मृत्यू आणि एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. उत्खनन करण्यासाठी वापरल्या जाणार्या जिलेटिनच्या कांड्यांची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करीत असताना हा स्फोट झाल्याची माहिती मिळाली आहे. घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही शोक व्यक्त केला आहे.
7. २३ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांचा श्रीलंका दौरा नियोजित आहे
भारताने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या विमानाला आपल्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करण्यासाठी परवानगी दिली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, इम्रान खान पहिल्यांदाच श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून यावेळी त्यांचं विमान भारतीय हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार आहे. २३ फेब्रुवारी रोजी इम्रान खान यांचा श्रीलंका दौरा नियोजित आहे.
8. "माझं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रकार"
पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर असणारे संजय राठोड यांनी अखेर मौन सोडलं आहे. संजय राठोड पोहरादेवीत दर्शनासाठी पोहोचले होते, यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. गेल्या ३० वर्षांपासून माझ्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक जीवनाला उद्ध्वस्त करण्याचा प्रकार सुरु असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
9. खासदार इम्तियाज जलील कोरोना पॉझिटिव्ह
मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथील एमआयएमचे मा.खासदार इम्तियाज जलील यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे कळते. मागील दोन-तीन दिवसापासून त्यांना कोरोना ची लक्षणे जाणवत होती. त्यानंतर त्यांनी कोरोना टेस्ट घेतली असता त्यांना कोरोना असल्याचे कळाले.
10. दिग्विजय सुर्यवंशी सांगलीच्या महापौरपदी
सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेवर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा झेंडा फडकला असून राष्ट्रवादीचे दिग्विजय सूर्यवंशी नवे महापौर झाले आहेत. या विजयाबरोबरच सध्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या एका वाक्याची आठवण विरोधकांना करुन दिली जात आहे. ‘टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोच’ या वाक्याचा आज प्रत्यय आला असल्याचं राष्ट्रवादीच्या कार्याकर्त्यांकडून सांगितलं जात आहे. सांगली मनपावर राष्ट्रवादी- काँग्रेस आघाडीचा महापौर बसल्यानंतर कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केलाय.
20 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - नवी मुंबईत कोरोना धोका वाढला...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. चंद्रकांत पाटलांचा अजब दावा
राजकीय नेते आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतात. कधी धार्मिक तर राजकीय टीकांमुळे पुढारी चर्चेत येतात. आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे एका कार्यक्रमातील भाषण व्हायरल झाले आहे. या भाषणात त्यांनी अजब दावा केला असून त्यांचा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरत आहे.
2. भारतात यंदा महिलांना मिळणार सगळ्यात जास्त नोकऱ्या
महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या जीवघेण्या काळामुळे आता नोकरी मिळणं मोठं कठीण झालं आहे. अशात आता तंत्रज्ञानाची मागणी वाढल्यामुळे तरुणांचा रोजगारही घटला आहे. पण डिजिटल क्रांतीमुळे महिलांच्या रोजगारामध्ये सुधारणा झाल्याचं पाहायला मिळालं.
3. पुण्यात 12 गावं कोरोनाची हॉटस्पॉट, चिंता वाढली
पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. येथील प्रशासन कोरोनाला थोपवण्याचा प्रयत्न करत असले तरी, म्हणावे तेवढे यश मिळत नाहीये. तालुका पातळीवर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ होत असून कोरोनाची धग गावकुसापर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील 12 गावं कोरोना हॉटस्पॉट म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.
4. संजय राऊतांकडून मोठी घोषणा
शिवेसना नेते संजय राऊत यांनी पुणे महापालिका निवडणुकीबाबत मोठ वक्तव्य केलं आहे. राऊत यांनी पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र लढतील, अशी घोषणा केली आहे. ते पुण्यात बोलत होते
5. व्यापारी असोसिशनचा निर्णय
अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल अमरावती जिल्ह्यात 598 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाले. या पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी महानगर पालिका आयुक्तांयांनी शहरातील व्यापाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. शहरातील गजबजलेली आणि मुख्य बाजारपेठ समजणारी सक्कर साथ या बाजारपेठेतील दुकाने सायंकाळी सहा वाजताच बंद करण्याचा निर्णय इथल्या व्यापाऱ्यांनि घेतला आहे.
6. नवी मुंबईत कोरोना धोका वाढला,
महापालिका क्षेत्रात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अनेक ठिकाणी गर्दी वाढत असल्याने नवी मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्येही मोठी गर्दी होते. या ठिकाणी मास्कचा वापर होताना दिसत नाही. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगही पाहायला मिळत नाही. त्यामुळे गेल्या काही दिवसांत नवी मुबंई परिसरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.
7. आमच्या जिल्ह्यात वेगळ्या प्रकारचा कोरोना! – गिरीश महाजन
भाजपला रामराम ठोकून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमय झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. खडसे यांना यापूर्वीही दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. त्यावर भाजप नेते गिरीश महाजन यांनी एक मागणी केली आहे. हा नेमका कोणत्या प्रकारचा कोरोना आहे, यावर शास्त्रज्ञांनी संशोधन करावं अशी मागणीच गिरीश महाजन यांनी केली आहे.
8. महाराष्ट्रात कोरोना प्रतिबंधक लसचे ५.२ टक्के डोस गेले वाया
महाराष्ट्रात ८ लाखांपेक्षा जास्त नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. पण आतापर्यंतच्या महाराष्ट्रातील लसीकरण मोहिमेत ५.२ टक्के डोस वाया गेले. जवळपास ४० हजार डोस वाया गेले.
9. जिवनात यशस्वी व्हायचे असेल तर रोटरीची चतुरसुत्री अंगिकारा
चोपडा रोटरी क्लबची स्थापना 1971 साली झाली असून सदर क्लबचे प्रथम अध्यक्ष डॉ नवाल होते , चोपडा रोटरी क्लब ला 50 वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्या प्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष प्रा अरुणभाई गुजराथी बोलत होते .
20 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - कोरोना नियम पाळण्यात 'आम्हीच चुकतोय' - विश्वजित कदम ..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. चेतनकुमार चोरडिया यांनी परिवारासह समाजबांधवाकडून मागीतली माफी
२२ फेब्रुवारी रोजी मालेगाव शहरात मुमुक्षु दिक्षार्थी चेतनकुमार चोरडिया यांची जैन भगवती दिक्षा संपन्न होणार असल्याचे औचित्य साधून विदाई चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगलाचरणाची सुरुवात दिपाली ललवाणी यांनी केली. चरण कमल धुवून बालवयात माझ्याकडून काय चुका झाल्या असतील त्या चुकांना विसरून मला माफ करा.
2. दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे लातूर रेल्वेस्थानकात भव्य स्वागत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी लातूर रेल्वे स्थानकावर कोल्हापूर - धनबाद (झारखंड) दीक्षाभूमी एक्सप्रेस या नवीन रेल्वेचे लातूरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी स्वागत करून हिरवा झेंडा दाखवून सदरील रेल्वे पुढच्या प्रवासास मार्गस्थ केली.
3. कीर्ती ऑइल मिल मध्ये जाळली जातात बेकायदेशीर लाकडे
लातूर येथील एम आय डी सी मध्ये असलेल्या किर्ती ऑईल मध्ये बॉयलर साठी लाकडी जाळली जातात. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा हे शासनाचे धोरण जरी असले, तरी झाडे तोडून जाळण्याचे काम या कीर्ती उद्योगाच्या माध्यमातून जोरदार चालू असल्याचे स्पष्ट दिसते. रात्रीच्यावेळी लाकडांनी भरलेले ट्रक या मिलमध्ये येतात. आणि लाकडे टाकून निघून जातात. या कीर्ती ऑईल मिल ला कोण पाठीशी घालत आहे.
4. नाना पटोले बिग बींची भूमिका असलेल्या झुंडला विरोध करणार
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पदभार स्वीकारल्यानंतर अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. पटोले यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
5. कोरोना नियम पाळण्यात 'आम्हीच चुकतोय' - विश्वजित कदम
एकीकडे महाविकास आघाडीमधील 3-4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये 'आमचे चुकतेय'असे म्हणत स्वतः जीभ चावली. दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावतोय
6. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरील बोरघाट बनतोय 'डेंजर झोन'
मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावरील बोरघाट या मार्गावरुन जाणाऱ्यांसाठी आता अतिधोकादायक ठरत आहे. बोरघाटातील वळण आणि उतार हे अनेकांच्या आयुष्यावर काळ होऊन घाला घालत आहेत. मागील काही दिवसांमध्ये अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, ढेकू गावनजीकच्या परिसरात अपघातात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे, तर २०१८ ते जानेवारी २०२१ दरम्यान बोरघाट परिसरात ६५ प्रवाशांचा मृत्यूही झाला आहे.
7. जमावबंदीनंतर नियमांची ऐशीतैशी, शेवटी जिल्हाधिकारीच उतरले रस्त्यावर
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढता असल्याने जमावबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी लागू केले आहेत. गुरुवारी सायंकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली, मात्र शुक्रवारीच या आदेशाची पायमल्ली होताना पाहायला मिळाली. शहरामध्ये या नियमांचे पालन होताना फारसे पहायला मिळाले नाही.
8. भारत आणखी ४९ देशांना देणार कोरोना लस
कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत गरीब देशांना कोट्यवधींच्या लस दिल्याबद्दल जगभरात भारताचं कौतुक होत आहे. आता अनेक श्रीमंत देशही आपल्या नागरिकांसाठी लसीची मागणी करत आहेत. कोरोनाची लस शेजारच्या देशांना पुरविल्यानंतर भारत आता कॅरिबियन देशांनाही लस देत आहे. भारतानं केलेल्या या लसींच्या वाटपाचं जगभरातून कौतुक होत आहे
9. आमदारांसह 300 ते 400 जणांविरोधात गुन्हा दाखल
राज्य सरकारने आखून दिलेले नियम धाब्यावर बसवत अकोला जिल्ह्यातील अकोट याठिकाणी शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. अकोट तालुक्याती कुटासा याठिकाणचा हा प्रकार आहे. याप्रकरणी दहीहंडा पोलिसांनी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शिवजयंतीच्या उत्साहाला एक वेगळे वळण मिळाले आहे.
10. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला 'हा' स्तुत्य निर्णय!
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. याबरोबरचं कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावेत अशा सूचना सरकारने केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
20 फेब्रुवारी सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांना आज संबोधित करणार पंतप्रधान....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
पूर्व लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पेगाँग लेकपासून उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यावर डिसएंगेजमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आज भारत आणि चीन दरम्यान महत्त्वाची चर्चा होणार आहे. दोन्ही देशादरम्यान दहाव्या फैरीतील उच्चस्तरीय सैन्य वार्ता होणार आहे. या बैठकीत डेपसांग, हॉट स्प्रिंग आणि गोगरामधील सैन्य वापसीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी आज कोरोना काळातील केलेल्या उपाययोजना, लसीकरण आणि नागरिकांचे आरोग्य या विषयावर नीती आयोगाची बैठक घेत आहेत. नीती आयोगाची ही सहावी बैठक असून आजची बैठक कोरोना काळातील आव्हाने आणि सरकारच्या उपाययोजना या पार्श्वभूमीवर महत्वाची असेल.
3. महाराष्ट्रासह 17 राज्यांमध्ये पावसाची शक्यता
हवामानात सध्या लागोपाठ चढ-उतार दिसून येत आहे. उत्तर भारत आणि देशाच्या अन्य भागात हलका पाऊस दिसून येत आहे, तर देशाच्या अनेक भागात पारा वाढू लागला आहे. हवामान विभागाने उत्तर प्रदेशाच्या अनेक भागात सुद्धा गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाशी संबंधित 'टूलकिट' प्रकरणात अटकेत असलेली 22 वर्षीय पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी च्या जामीन अर्जावर आज पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिशा रवीची पाच दिवसांची कोठडी शुक्रवारी संपल्यानंतर तिला पुन्हा तीन दिवसीय न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
5. इंद्र कुमारने गळफास लावून संपवली जीवनयात्रा
बॉलिवूड अभिनेता संदीप नाहरने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता आणखी एका अभिनेत्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे समजते आहे. तमीळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील अभिनेता इंद्र कुमारने गळफास लावून आत्महत्या केली आहे. चेन्नईतील त्याच्या मित्राच्या घरी सकाळी तो मृतावस्थेत आढळला आहे.
6. खासदार नुसरत जहाँने भाजप प्रवेशाच्या अफवा फेटाळल्या
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टॉलिवूड कलाकारांनी राजकारणाच्या दिशेने मोर्चा वळवला आहे. आता या यादीत बंगाली अभिनेते यश दासगुप्ता यांचं नाव जोडलं गेलं आहे. दासगुप्ता हे तृणमूलच्या खासदार नुसरत जहाँ यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत. पण दासगुप्ता यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
7. अर्जुनच्या लिलावामुळे युजर्स नाराज
इंडियन प्रीमियर लीग च्या 14 व्या मोसमाच्या अगोदर गुरुवारी चेन्नईत खेळाडूंचा लिलाव संपला. यावर्षीच्या लिलावात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली होती, ज्यांना विक्री होण्याची काहीच आशा नव्हती. या खेळाडूंपैकी एक अर्जुन तेंडुलकर.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आपल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केलं होतं, असा दावा त्यांनी केला आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या भाजपच्या युवा मोर्चाच्या वॉरिअर्स कार्यक्रमात त्यांनी हे अजब वक्तव्य केलं.
20 फेब्रुवारी Good Morning सह्याद्री
News24सह्याद्री - पंढरपूर शहरासह १० गावात २४ तासांची संचारबंदी जाहीर...पहा सकाळच्या ताज्या बातम्यांचे अपडेट
1. पंढरपूर शहरासह 10 गावात 24 तासांची संचारबंदी जाहीर
कोरोनाचा वाढत्या संकटामुळे यंदा माघी यात्राही भाविकाविनाच साजरी होणार असून यात्रेसाठी 22 फेब्रुवारी रात्री 12 पासून 23 फेब्रुवारी रात्री 12 पर्यंत 24 तासांची संचारबंदी पंढरपूर शहर व परिसरातील 10 गावात लागू करण्यात अलिय. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.
2. भंडारा जळीत कांडात प्रशासन जबाबदार - चंद्रशेखर बावनकुळे
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता कक्षात 8 जानेवारीच्या मध्यरात्री आग लागून 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला होता. तब्बल 39 दिवसानंतर दोन कंत्राटी नर्सवर या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, भंडारा जळीत कांडात दोन नर्सवर गुन्हा दाखल झाल्यावर त्यांनी स्वत:चा बचाव केलाय.
3. अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी ठाकरे सरकारकडून कोरोनाचा बाऊ
माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केलाय. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामधून पळ काढण्यासाठी सरकारकडून कोरोनाचा आता बाऊ केला जातोय. कोरोनाचा बाऊ करून आठवड्याभरातच अधिवेशन गुंडाळुया असा सरकारचा विचार आहे, असे खोत म्हणालेत.
7. मानवत शहरामध्ये शिवजन्मोत्सव मोठ्या उत्सहात साजरा
मानवत येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने प्रेरणाताई वरपुडकर व माजी आमदार मोहनराव फड यांच्या हस्ते सार्वजनिक शिवजन्मोत्सव मिरवणुकीचे उदघाटन करण्यात आले. या मिरवणूकीमध्ये जगद्गुरु तुकोबाराय, जिजाऊ माँ साहेब, छञपती शिवराय, शंभूराजे व मावळे यांचे सजीव देखावे मिरवणूकीचे आकर्षक ठरले तर डाके महाराज संस्थानातील विद्यार्त्यांनी वारकरी वेश्यात भारुड, पाऊली खेळून अनेकांची मने जिंकली.
8. रांगोळीने साकारले छञपती शिवराय
परभणीतील रांगोळी कलाकार योगिता खंदारे हिने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त तमाम शिवभक्तांना रांगोळीच्या कलेच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या . छञपती शिवाजी महाराज यांचे हे चित्र परभणी येथील शिवाजी चौक या ठिकाणी ठेवण्यात आले. अनेक शिवप्रेमींनी हि कलाकृती पहाण्यासाठी गर्दी केली होती.
9. शिवजयंती निमित्त बेरोजगारांनसाठी रोजगार मेळावा
डोंबिवलीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास आजूबाजूच्या परिसरातील बेरोजगार युवक युवतींनी चांगला प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळाले.
10. 19 हजार 'जय शिवराय' ठश्यांनी रेखाटले महाराजांचे चित्र
डोंबिवलीच्या सांगाव येथील शिवमंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निम्मित १९ हजार रबर स्टॅम्प च्या ठस्यांनी महाराजांचे चित्र रेखाटले आहे. डोंबिवली मधील तरुण कलाकार श्रद्धा पाटील हिने हे चित्र रेखाटले आहे.'जय शिवराय' ठस्यानी हे चित्र तयार केले असून यासाठी श्रद्धाला खूप मेहनत घ्यावी लागली असल्याचे तिने सांगितले.
सह्याद्री टॉप २४ न्यूज - नाशिक शहरात अनेक भागांना पाणीपुरवठा नाही
News24सह्याद्री - नाशिक शहरात अनेक भागांना पाणीपुरवठा नाही...पहा सह्याद्री TOP 24 HEADLINES
16 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट
News24सह्याद्री - उद्धव ठाकरेंनी दिला शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश.....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
1. एक-दोन नव्हे, चाळीस घरं फोडली
घरफोड्या करणाऱ्या अट्टल दरोडेखोरांना अखेर सोलापूर पोलिसांनी अटक (Thieves Arrested By Solapur Police) केली आहे. आंध्र प्रदेश पोलिसांनीही या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गेल्या महिनाभरापासून हे चोरटे पोलिसांना चुकवत होते. अखेर आता सोलापूर पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या.
2. जिल्हाधिकाऱ्यांकडून दंडात्मक कारवाई
पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठकीत मास्क न घातल्याने जिल्हा परिषद अध्यक्षा भारती कामडी यांच्यावर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी दंडात्मक कारवाई केली आहे. मास्क विसरल्याची कबुली अध्यक्षा कामडी यांनी दिल्यानंतर त्यांना दोनशे रुपयांचा दंड आकारुन मास्क देण्यात आला.
3. वासिम जाफरनं दिला राजीनामा; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
भारतीय संघाचा माजी सलामीवीर वासिम जाफर हा मागील अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्याच्यावर मुस्लिम खेळाडूंना प्राधान्य दिल्याचा आरोप केला जात होता. त्यामुळेच जाफरनं उत्तरखंड क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला. उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी वासिमवर धर्मावर आधारीत संघ निवडीचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
4. ३९ जणांचा मृत्यू तर इतरांचा शोध सुरू
मध्य प्रदेशातील सीधी येथे बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत ३९ जणांचा मृतदेह सापडला आहे. मृतकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान सरकारने सर्व कार्यक्रम स्थगित केले असून मयताच्या कुटुंबीयांना ५ लाख रूपये नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली आहे.
5. युद्ध लढलेले मेजर जनरल बीके महापात्रा यांचे निधन
मेजर जनरल निवृत्त बसंतकुमार महापात्रा यांचे सोमवारी रात्री निधन झाले. वयाच्या ८७ व्या वर्षी ओडिशाच्या भुवनेश्वर येथील रुग्णालयात अखेरचा त्यांनी श्वास घेतला. दिग्गज लष्कर अधिकारी मेजर जनरल बी.के. महापात्रा यांना लढाऊ अधिकारी म्हणून भारतीय लष्कराच्या आर्म्ड कॉर्प्स (टॅंक) वर नेण्यात आले.
6. उद्धव ठाकरेंनी दिला शिवसैनिकांना महत्त्वाचा आदेश
सत्ता स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच शिवसेनेची पॉवरफुल बैठक आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackery) यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी राज्यातील प्रत्येक गावात शिवसेना पोहोचवा, असा महत्त्वाचा आदेश उद्धव ठाकरे यांनी आपल्या शिवसैनिकांना दिला.
7. ममतांचे माँ कँटीन देणार पाच रूपयांत जेवण
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी कोलकत्ता येथे पाच रूपयांमध्ये जेवण देणारी ”माँ कँटीन” ही योजना सुरू केली. सुरूवातीला कोलकत्त्यामध्ये १६ ठिकाणी ही योजना राबवली जाईल, जिथे कमीतकमी एक हजारापेक्षा जास्त लोकांना दुपारचे जेवण देण्यात येईल.
8. गोपनीयतेबाबत व्हॉटसअॅपला नोटीस
युरोपीय देशांच्या तुलनेत भारतात व्हॉटसअॅप वापरकर्त्यांची गोपनीयता कमी राखत असून न्यायलयानेच लोकांच्या गोपनीयतेचे रक्षण करावे, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार व व्हॉटसअॅप यांना नोटिसा जारी केल्या आहेत.
9. कंटेनरने चार वाहनांना दिली धडक
मुबंई-पुणे एक्सप्रेस-वेवर भीषण अपघात झाला आहे. वाहनांनी एकमेकांना धडक देऊन झालेल्या या भीषण अपघाताच पाच जणांचा मृत्यू झाला असून, पाच जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पाच वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे.
10. सांडपाणी प्रक्रिया केंद्र सुरू
तारापूर येथील जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राला पुन्हा कार्यरत करण्यासाठीही सशर्त परवानगी देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने अनेक निर्बंध घातले असले तरीसुद्धा हे प्रक्रिया केंद्र सुरू झाल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.