Breaking News

1/breakingnews/recent

26 फेब्रुवारी सह्याद्री सुपरफास्ट

No comments

News24सह्याद्री -  नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण....पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा


TOP HEADLINES

1. नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण

नरेंद्र मोदींचे नाव स्टेडीयमला का दिले? प्रकाश आंबेडकरांनी सांगितले कारण.. अहमदाबाद मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल या जगातल्या सर्वोत मोठ्या स्टेडीअमच्या उद्घाटन समारंभात स्टेडीअमचे नामकरण नरेंद्र मोदी केल्यानंतर सर्व स्थरातून टिका होत असताना बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नरेंद्र मोदींना मृत्यूनंतर आपल्याला कोणी लक्षात ठेवणार की नाही याबद्दलची खात्री नसल्यानेच स्टेडिअमला आपलं नाव दिल्याची टीका केली आहे.

2. अकोला परिमंडळात ४८ तासात ३४० वीज चोरांवर कारवाई..17 लाखांची वीज चोरी
परिमंडळातील थकबाकी वसूलीचे आवाहन समोरअसतांना परिमंडळाअंतर्गत अकोला,बुलढाणा व वाशीम जिल्ह्यात वीज चोरीचा वाढलेला प्रकार महावितरणसाठी मोठे आव्हान ठरत आहे.त्यामुळे महावितरणने वीज अशा चोराविरूध्द एक्शन घेत वेगवेगळ्या ठिकाणी मारलेल्या धाडीत परिमंडळात गेल्या ४८ तासात ३४० वीज चोरांवर कारवाई केली आहेय.यामध्ये थेट वीज चोरी किंवा मीटरमध्ये फेर फार करून वीज चोरी करणाऱ्यांची संख्या ही ३२६ आहे. 

3. शिरपूर शहरात मास्क फिरणाऱ्यांवर कारवाई
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असल्याने राबवायच्या उपाययोजना आणि परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज सकाळी 10 वाजता उपविभागीय अधिकारी डॉ.विक्रमसिंग बांदल यांच्या अध्यक्षतेखाखाली आढावा बैठक झाली.या बैठकीनंतर शिरपूर शहरातील दैनंदिन व्यवहारांवर काही प्रमाणात निर्बंध येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शहरात मास्क न वापरणाऱ्या चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

4. अकोल्याच्या दामिनी पथकाच्या प्रमुखपदी पीएसआय स्वाती इथापे.
महिला व मुलींच्या छेडखानीला पायबंद घालणे आणि प्रत्येक महिलेला भयमुक्त वातावरणात वावरता यावे, म्हणून पोलिस दलाने स्वतंत्र दामिनी पथक गठित केले आहेय. अकोल्यात या पथकाच्या प्रमुख पदी पोलिस उपनिरीक्षक स्वाती मधुकर इथापे यांची नियुक्ती पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी केली आहे.

5. पाच दिवसांपासून कचरा संकुलात पडून,परिसरात पसरली दुर्गंधी !
डोंबिवली पूर्वेतील आयरे रोड येथील बालाजी गार्डनमध्ये 9 सोसायट्या असून 522 सदनिका असून 2 हजाराच्या आसपास लोकसंख्या आहे. दरवर्षाला 55 लाख रुपये कर भरुनही पालिका प्रशासन रहिवाशांना सहकार्य करीत नाही. सोसायटी आवारात कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी जागा नाही.

6. पेट्रोलियम मंत्र्यांचं अजब विधान
इंधनाच्या वाढत्या दरांमुळे एकीकडे सर्वसामान्य जनता त्रस्त असताना विरोधकांनीही या मुद्द्यावरुन केंद्र सरकारला घेरलं आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी हिवाळा संपल्यानंतर इंधनाचे दर कमी होतील असं म्हटलं आहे. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी हिवाळ्यात मागणी वाढत असल्याने इंधनाचे दर वाढत असल्याचं वक्तव्य केलं आहे.

7. WHOने मानले नरेंद्र मोदींचे आभार
जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रॉस अधानॉम घेबेरियसस यांनी गुरुवारी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छोट्या देशांना मदत करण्यासाठी आणि लस समानतेला समर्थन देण्यासाठी आभार मानले. त्यांनी अशी आशा व्यक्त केली की, इतर देशांनीही भारताच्या अनुसरण केले पाहिजे.

8. प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ;
केरळमध्ये प्रवासी ट्रेनमध्ये स्फोटकांचा साठा सापडल्याने खळबळ उडाली आहे. कोझिकोड रेल्वे स्थानकावर ट्रेनमध्ये १०० हून अधिक जिलेटिनच्या कांड्या आणि ३५० डिटोनेटर सापडले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. चेन्नई-मंगलपुरम एक्स्प्रेसमधून स्फोटकांचा हा साठा जप्त करण्यात आला आहे. एका महिलेकडून रेल्वे पोलिसांकडून हा साठा जप्त केला असून तिला ताब्यात घेण्यात आलं आहे.

9. केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांचं वक्तव्य
केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सुनावलं आहे. दोन्ही नेत्यांनी केरळमध्ये आपल्या रॅलीदरम्यान डाव्या सरकारवर टीका केली होती. “वायनाडचे खासदार राहुल गांधी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा केरळच्या बाबतीत वेगळा दृष्टीकोन असेल, पण डाव्यांबाबत त्यांची भावना मात्र समान आहे. याबाबीत त्यांचं एकमत आहे,” असं पिनराई विजयन यांनी म्हटलं आहे.

10. दैनंदिन प्रवाशांना, पासधारकांना प्रवेश नसल्याने संताप
मुंबई ते वलसाड दरम्यान धावणारी व हजारो दैनंदिन प्रवाशांचा आधार असणारी  वलसाड फास्ट पॅसेंजर ही गाडी १ मार्चपासून पुन्हा सुरू करण्याचे पश्चिम रेल्वेने योजिले आहे. मात्र, ही गाडी पूर्णपणे आरक्षित राहणार असल्याचे घोषित केल्याने दैनंदिन प्रवाशांना तसेच पासधारकांना या गाडीतून प्रवास करता येणार नाही. त्यामुळे प्रवाशांत संताप व्यक्त होत आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *