20 फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन
News24सह्याद्री - कोरोना नियम पाळण्यात 'आम्हीच चुकतोय' - विश्वजित कदम ..जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
1. चेतनकुमार चोरडिया यांनी परिवारासह समाजबांधवाकडून मागीतली माफी
२२ फेब्रुवारी रोजी मालेगाव शहरात मुमुक्षु दिक्षार्थी चेतनकुमार चोरडिया यांची जैन भगवती दिक्षा संपन्न होणार असल्याचे औचित्य साधून विदाई चे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मंगलाचरणाची सुरुवात दिपाली ललवाणी यांनी केली. चरण कमल धुवून बालवयात माझ्याकडून काय चुका झाल्या असतील त्या चुकांना विसरून मला माफ करा.
2. दीक्षाभूमी एक्स्प्रेसचे लातूर रेल्वेस्थानकात भव्य स्वागत.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी लातूर रेल्वे स्थानकावर कोल्हापूर - धनबाद (झारखंड) दीक्षाभूमी एक्सप्रेस या नवीन रेल्वेचे लातूरचे खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी स्वागत करून हिरवा झेंडा दाखवून सदरील रेल्वे पुढच्या प्रवासास मार्गस्थ केली.
3. कीर्ती ऑइल मिल मध्ये जाळली जातात बेकायदेशीर लाकडे
लातूर येथील एम आय डी सी मध्ये असलेल्या किर्ती ऑईल मध्ये बॉयलर साठी लाकडी जाळली जातात. एकीकडे झाडे लावा झाडे जगवा हे शासनाचे धोरण जरी असले, तरी झाडे तोडून जाळण्याचे काम या कीर्ती उद्योगाच्या माध्यमातून जोरदार चालू असल्याचे स्पष्ट दिसते. रात्रीच्यावेळी लाकडांनी भरलेले ट्रक या मिलमध्ये येतात. आणि लाकडे टाकून निघून जातात. या कीर्ती ऑईल मिल ला कोण पाठीशी घालत आहे.
4. नाना पटोले बिग बींची भूमिका असलेल्या झुंडला विरोध करणार
महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पदभार स्वीकारल्यानंतर अॅक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. पटोले यांनी बिग बी अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांच्या चित्रपटाचे शूटिंग महाराष्ट्रात होऊन देणार नाही, तसेच त्यांच्या सिनेमांचे प्रदर्शन देखील राज्यात होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिल्यानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.
5. कोरोना नियम पाळण्यात 'आम्हीच चुकतोय' - विश्वजित कदम
एकीकडे महाविकास आघाडीमधील 3-4 मंत्री कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर दुसरीकडे अजूनही काही राजकीय मंडळी कोरोनाला हलक्यात घेत सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता मेळावे, सभा घेत आहेत. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कोरोनाचे नियम पाळण्यामध्ये 'आमचे चुकतेय'असे म्हणत स्वतः जीभ चावली. दुर्दैवाने आम्ही ना सोशल डिस्टन्स पाळतोय ना पूर्णवेळ मास्क लावतोय
6. मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरील बोरघाट बनतोय 'डेंजर झोन'
मुंबई - पुणे एक्स्प्रेस मार्गावरील बोरघाट या मार्गावरुन जाणाऱ्यांसाठी आता अतिधोकादायक ठरत आहे. बोरघाटातील वळण आणि उतार हे अनेकांच्या आयुष्यावर काळ होऊन घाला घालत आहेत. मागील काही दिवसांमध्ये अमृतांजन पूल, आडोशी बोगदा, ढेकू गावनजीकच्या परिसरात अपघातात वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नव्हे, तर २०१८ ते जानेवारी २०२१ दरम्यान बोरघाट परिसरात ६५ प्रवाशांचा मृत्यूही झाला आहे.
7. जमावबंदीनंतर नियमांची ऐशीतैशी, शेवटी जिल्हाधिकारीच उतरले रस्त्यावर
यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढता असल्याने जमावबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी लागू केले आहेत. गुरुवारी सायंकाळपासून या आदेशाची अंमलबजावणी सुरू झाली, मात्र शुक्रवारीच या आदेशाची पायमल्ली होताना पाहायला मिळाली. शहरामध्ये या नियमांचे पालन होताना फारसे पहायला मिळाले नाही.
8. भारत आणखी ४९ देशांना देणार कोरोना लस
कोरोना विषाणूविरूद्धच्या लढाईत गरीब देशांना कोट्यवधींच्या लस दिल्याबद्दल जगभरात भारताचं कौतुक होत आहे. आता अनेक श्रीमंत देशही आपल्या नागरिकांसाठी लसीची मागणी करत आहेत. कोरोनाची लस शेजारच्या देशांना पुरविल्यानंतर भारत आता कॅरिबियन देशांनाही लस देत आहे. भारतानं केलेल्या या लसींच्या वाटपाचं जगभरातून कौतुक होत आहे
9. आमदारांसह 300 ते 400 जणांविरोधात गुन्हा दाखल
राज्य सरकारने आखून दिलेले नियम धाब्यावर बसवत अकोला जिल्ह्यातील अकोट याठिकाणी शिवजयंती निमित्त शोभायात्रा काढण्यात आली. अकोट तालुक्याती कुटासा याठिकाणचा हा प्रकार आहे. याप्रकरणी दहीहंडा पोलिसांनी विधान परिषद सदस्य आमदार अमोल मिटकरी यांच्यासह 300 ते 400 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे शिवजयंतीच्या उत्साहाला एक वेगळे वळण मिळाले आहे.
10. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला 'हा' स्तुत्य निर्णय!
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. त्यामुळं महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. याबरोबरचं कोरोनाचे नियम सर्वांनी पाळावेत अशा सूचना सरकारने केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे.
No comments
Post a Comment