Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label vithuraya. Show all posts

१२फेब्रुवारी- पाहा विठुरायाचे सावळे सुंदर रुप मनोहर

NEWS24सह्याद्रि 

आज माघी शुद्ध अर्थात जया एकादशी आहे,या निमित्ताने विठ्ठल मंदिराला आकर्षक फुल सजावट करण्यात आली आहे वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने आजच्या माघ शुद्ध दशमीलाही अनन्यसाधारण महत्व आहे.पंढरपुरात विठुराया आणि रुक्मिणी मातेचं दर्शन करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे.माघी एकादशीसाठी चंद्रभागेच्या पात्रामध्ये नवीन पाणी सोडायची व्यवस्था केली आहे.माघी यात्रेसाठी तीन लाखांपेक्षा जास्त भाविक पंढरपुरात पोहोचले आहेत.विठ्ठल मंदिराला या निमित्ताने आकर्षक फुलांनी सजवण्यात आलं आहे.माघी यात्रेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त शहरात दाखल करण्यात आहे.


पंढरपूरच्या चंद्रभागा नदीला प्रदूषणाचा विळखा



NEWS24सह्याद्री 

चंद्रभागेच्या पाण्यात भाविक स्नान करून बाहेर येताच त्यांच्या अंगाला खाज सुटणे अश्या अनेक प्रकारचे त्रास होत असल्याची भाविकांची तक्रार आहे.पंढरपुरात गेल्या नंतर विठुरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा स्नान आणि पुंडलिकाचे म्हणजे संतांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे .मात्र सध्या या चंद्रभागेच्या स्नानाला येणाऱ्या भाविकांना प्रदूषित झालेल्या चंद्रभागेमुळे त्वचा विकार होत असल्याची तक्रार अनेकांनी केली आहे. तसंच या पाण्यात आळ्या आणि किडेही मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. त्यामुळं तातडीने चंद्रभागेतील पाणी प्रवाहीत करून नदीचं प्रदूषण दूर करावं अशी मागणी वारकरी आणि स्थानीक नागरीकांनी केली आहे. 

       ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर, ऐसा विटेवरी देव कोठे म्हणत विठुरायाच्या दर्शनाला येणारे  हजारो भाविक आधी चंद्रभागेचे पवित्र स्नान करतात आणि मगच विठुरायाच्या दर्शनाला जातात. वारकरी संप्रदायात विठुरायाच्या दर्शनापूर्वी चंद्रभागा स्नान आणि पुंडलिकाचे म्हणजे संतांचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. मात्र सध्या या चंद्रभागेच्या स्नानाला येणाऱ्या भाविकांना प्रदूषित झालेल्या चंद्रभागेमुळे त्वचा विकार होण्यास सुरुवात झाली असून स्नान करून बाहेर आले की अंग खाजवायला सुरुवात होत असल्याची तक्रार भाविक करू लागले आहेत.           

सध्या कोरोना सुरु असून याच पाण्यात स्नान केल्यामुळे त्वचा विकार वाढू लागले आहेत. या पाण्यात जनावरे आणि वाहने देखील धुतली जात असल्याने पाण्याला घाण दुर्गंधी येत आहे. विठ्ठल दर्शनाला देशभरातून येणार भाविक हा या पवित्र पाण्याने स्नान करतो तसेच हे पाणी तीर्थ म्हणून घेतो.  मात्र प्रशासन या प्रदूषित पाण्याबाबत विचार करीत नसल्याने याचा फटका रोज हजारो भाविकांना बसत आहे.या गोष्टीला आळा बसण्यासाठी  ठराविक दिवसानंतर चंद्रभागेतील पाणी बदलण्यासाठी तरी प्रशासनाने प्रयत्न केल्यास भाविकांना होणारे आरोग्याचे त्रास कमी होतील अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे . प्रशासनाचा गलथानपणा पाहायचा असेल तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीपुन्हा चौकशी केली तर  भाविकांना भोगाव्या लागणाऱ्या मरण यातना त्यांना समजतील अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश अंकुशराव यांनी केली आहे. 



Contact Me

Name

Email *

Message *