Breaking News

1/breakingnews/recent
Showing posts with label wine. Show all posts

१२ फेब्रुवारी-वाईन विक्रीचा वाद सुरुच निर्णय लांबणीवर

                                    

NEWS24सह्याद्रि 

राज्यभरातील किराणा दुकानातून वाईन विक्री करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु,नव्या नियमावलीच्या नियमाचा प्रारूप आधी प्रसिद्ध केले जाईल. त्यावर जनतेच्या प्रतिक्रीया आणि हरकती मागवल्या जातील त्यानंतरच या संदर्भातील अंतिम निर्णय होणार आहे ऐसे नुकतेच जाहिर करण्यात आलय... किराणा दुकाणातून वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून या निर्णयाला विरोध होत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारच्या निर्णयावर कडाडून टीका केली होती. तर सरकारमधील अनेक मंत्र्यांनी वाईन ही दारू नसून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी हा निर्णय घेतल्याचे म्हटले होते. परंतु, अण्णा हजारे यांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारने आपल्या निर्णयावर जनतेच्या प्रतिक्रीया मागवणार असल्याचे म्हटले आहे. 

याच अनुषंगाने येत्या सोमवारपासून जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दोन पाऊलं मागे घेण्याचं ठरवलं आहे. नाशिक विभागाचे आयुक्त राधाकृष्ण गमे हे यापूर्वीच अण्णा हजारे यांच्या भेटीसाठी रवाना झाले आहेत त्याचबरोबर राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी याआधीच अण्णा हजारे यांची भेट घेतली आहे. आज या विभागाच्या सचिव वत्सला नायर या  याबाबतचे पत्र घेऊन आण्णा हजारे यांच्या भेटीला जाणार आहेत.याबाबत अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.

काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने वाईन विक्रीसंबंधी जो धोरणात्मक निर्णय घेतला आहे, त्यानुसार सुपरमार्केट आणि किराणा दुकानांमधून वाईन विक्री सुरू करणे महाराष्ट्रासाठी अतिशय दुर्दैवी आहे. केवळ राज्याचा वाढणारा महसूल आणि वाईन उत्पादक आणि विक्रेते यांचे हित पाहून हा निर्णय घेतल्याचे दिसून येते. पण या निर्णयामुळे होणारे दुष्परिणाम  सरकारने केलेला दिसत नाही, याची खंत वाटत असल्याचे अण्णा हजारे यांनी पत्रात म्हटले आहे. युवा शक्ती ही आमची राष्ट्रशक्ती आहे. ती बरबाद करू पाहणाऱ्या निर्णयाला विरोध करण्याशिवाय पर्याय नाही. वाईन ही दारू नाही असा दुर्दैवी युक्तिवाद सरकारकडून करण्यात येत आहे, हेही आश्वचर्यकारक असल्याचे अण्णा हजारे यांनी आपल्या पत्रातून म्हटले आहे.  

७ फेब्रुवारी-सह्याद्री टॉप १० न्यूज

   अहमदनगर - गाण्याचा आत्मा परमेश्वराने हिरवला - कोल्हे

...-अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० न्यूज मध्ये....



बनावट मद्य व हातभट्टी गावठी दारूमध्ये मिश्रीत मद्य जप्त

सोनईत पडक्या घरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या

भूपाळी ते भैरवी गाणारे स्वररत्न देशाने गमावले - आ.विखे

आपल्या सुमधुर सुरांमधून लतादीदी अजरामर झाल्या- ना. थोरात

४फेब्रुवारी- सदाभाऊ खोत यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र





NEWS24सह्याद्रि 

वाईन विक्रीच्या मुद्यावरुन रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहले आहे. यामध्ये हातभट्टी,मोहफुलांच्या वाईन विक्रीला परवानगी द्यावी अशी मागणी त्यांनी केली.राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर राज्यातील विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. या निर्णयावर काही नेत्यांनी टीका केली आहे तर काही जणांनी या निर्णयाचे समर्थन केले आहे. दरम्यान, या मुद्यावरुन रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहले आहे. या पत्रामध्ये त्यांनी वाईनप्रमाणेच गुळापासून बनवलेल्या हातभट्टीची वाईन आणि मोहाच्या फुलांची वाईन विकण्यासाठी मॉल व किराणा दुकानांमध्ये परवानगी मिळावी अशी मागणी केली आहे. 

महाविकास आघाडी सरकारने किराणा दुकानामध्ये आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा जो निर्णय घेतला आहे, त्याचं महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी मोठ्या आनंदाने स्वागत करत आहे. आपल्या या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादकांना सोन्याचे दिवस येणार आहेत. त्यामुळे द्राक्ष उत्पादकांनी आपल्या घरावर या निर्णयामुळे गुढी उभारुन स्वागत केले आहे.

या पत्राद्वारे आपणास एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून देत आहे, की आपण वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील गुळ उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गुळ व्यवसाय हा सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे. अनेक गुऱ्हाळघरे बंद पडलेले आहेत. ही गुऱ्हाळघरे जर नव्याने पूर्वीसारखी चालवायची असतील तर गुळापासून गावठी हातभट्टी वाईन बनवायला परवानगी देण्यात यावी. सदर वाईन ही कमी खर्चात तयार करता येईल. गुळाची वाईन तयार करायचे कारखाने गावागावांमध्ये उभा करता येतील. यातून रोजगार तर वाढेलच पण ऊस उत्पादकांना सोन्याचे दिवस येतील. तसेच आदिवासी शेतकऱ्यांनाही आपणास न्याय द्यावा लागेल.  मोहाच्या फुलांची वाईन बनवून त्याच्या विक्रीला परवानगी द्यावी. कारण सध्या आपण शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहात, असे सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

Contact Me

Name

Email *

Message *