बिल भरणा केंद्रावर 10 रुपयांच्या नाण्याची चिल्लर घेऊन आला; अधिकाऱ्याने तीनेवळा परत पाठवले

मुंबई -
वर्धा जिल्ह्यामध्ये वीज बिल भरण्याचा आग्रह करणाऱ्या महावितरणच्या बिल भरणा केंद्रावर बिल स्वीकारत नसल्याचा प्रत्यय वर्ध्यातील एका ग्राहकाला सातत्याने येत आहे. याला कारणही तसेच आहे. एका पानटपरीवाल्यानी १० हजार रुपयाची चिल्लर आणली पिशवीत आणलेली चिल्लर नाणी मोजायला त्रास होत असल्याने वीज भरणा केंद्रावरील अधिकाऱ्यांनी या ग्राहकाला तीनवेळा परत पाठवले आहे. प्रवीण चुकेवार असे या ग्राहकाचे नाव असून तो पान टपरी चालवतो. तो आपले 14 हजारांचे बिल भरण्यासाठी वर्ध्यातील राम नगरच्या बिल भरणा केंद्रावर 10 रुपयांच्या नाण्याची चिल्लर घेऊन आला होता. मात्र, येथील अधिकाऱ्यांनी त्याला तीनवेळा परत पाठवले आहे.प्रवीण चुकेवर हे वर्ध्याच्या सिंधी (मेघे) परिसरात वास्तव्याला आहेत. याठिकाणी त्यांचा पान टपरीचा व्यवसाय आहे. व्यवसायामुळे चिल्लर जमा होणार हे स्वाभाविक आहे. यांना एकूण 14 हजार रुपये विजेचे बिल आले. मात्र रिडींग जास्त घेण्यात आल्याने त्यांचे दोन हजार कमी झाले.
आता त्यापैकी 12 हजार रुपये त्यांना भरायचे आहेत. 12 हजार रुपये बिल भरतांना चुकेवार यांनी 4 हजार रुपयांचे दहाची नाणी आणि 7 हजार रुपयांच्या10 रुपयांच्या नोटा असे एकूण 12 हजार रुपये घेऊन वीज बिल भरणा केंद्र गाठले. पण केंद्रावर काउंटरवर पोहचलेल्या चुकेवार यांच्या पदरी निराशाच आली. बिल भरणा केंद्रातील कर्मचाऱ्यांनी चिल्लर घेण्यास नकार दिला. पहिल्यांदा गर्दी असल्याने आपल्याला परत केले असेल असा समज झालेल्या चुकेवार यांनी दुसऱ्या दिवशी पुन्हा बिल भरण्याचा प्रयत्न केला. पण आपण चिल्लर स्वीकारणारच नाही असे ठामपणे सांगून चिल्लर स्वीकारलीच नाही. महावितरणच्या अतिरिक्त अभियंते नरेश पारधी यांच्याकडे ग्राहकाने धाव घेतली पण नरेश यांच्याकडून निराशाच पदरी पडली. अखेर सदर नाणी स्वीकारण्याचे आश्वासन देण्यात आले. अखेर ही नाणी का घेण्यात येत नव्हती याचे कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता एसबीआय बँकेच्या काउंटरवर ही नाणी स्वीकारली जात असल्याचे उत्तर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी दिले.
No comments
Post a Comment