Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेटला पुन्हा कुलूप

No comments

 News24सह्याद्री कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेटला पुन्हा कुलूप....पहा शहराची खबरबात मध्ये


TOP HEADLINES

1. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य गेटला पुन्हा कुलूप  
कै. दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दाराचे एक गेट १० ऑक्टोबर २०१८ पासून शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून एकेरी वाहतूक नावाखाली बंद करण्यात आलेले होते. त्या गेटचे कुलूप शहर शिवसेनेने तोडून ते वापरासाठी खुले केले होते. पण त्या गेटला पुन्हा कुलूप लावण्यात आले आहे. शिवसेनेचे गेट उघडण्याचे आंदोलन औट घटकेचेच ठरले आहे

2. इमामपूर परिसरात वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करा

नगर तालुक्यातील इमामपूर परिसरातील डोंगररांगांमध्ये वन्यप्राण्यांसाठी पाणवठे तयार करून त्यांमध्ये पाणी सोडण्याची मागणी सरपंच भीमराज मोकाटे यांनी वनविभागाला दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.वनविभागाला दिलेल्या निवेदनात मोकाटे यांनी इमामपूर परिसरात पाण्याचा तुटवडा जाणवत असून वन्य प्राण्यांचे पाण्यावाचून हाल होत आहेत. त्यामुळे डोंगररांगांमध्ये पाणवठे तयार करून त्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी केली आहे.

3. संकट काळात निधी उपलब्ध करणे नगरसेवकांचे कौशल्य
कोरोना संकटाच्या काळामध्ये संपूर्ण राज्यासह आपल्या महापालिकेवर आर्थिक संकट ओढलेले असतानाही प्रभाग दोन च्या नगरसेविका रुपाली वारे, संध्या पवार नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे सुनील त्र्यंबके आणि बाळासाहेब पवार यांनी प्रभागाच्या विकासासाठी महापालिका व आमदार संग्राम जगताप यांच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे. 

4. सक्तीची वसुली थांबवा
महावितरनाचे वसुली भाई ज्याप्रकारे लोकांकडून सक्तीची वीज बिले वसूल करत आहेत. तो थुकरट पणा तात्काळ थांबवा अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने कार्यक्रम हाती घेईल. नाहीतर  येत्या आठ दिवसात हल्लाबोल आंदोलनाला सामोरे जावे लागणार असा इशारा  महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

5. अंगणवाडीतील मुलांच्या बौद्धिक विकासासाठी करणार खेळणी खरेदी
बुधवारी जिल्हा परिषदेत समितीची मासिक सभा झाली. त्यात विविध विषयांवर चर्चा करून साहित्य खरेदीचा निर्णय झाला. बाल्यावस्था ही मानवी विकासाच्या अवस्थेमध्ये महत्त्वाची अवस्था आहे. या टप्प्यात बालकांचा बौद्धिक विकास होणे गरजेचे असते.  बालकांच्या मूलभूत सुधारणा कार्यक्रमांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर असा उपक्रम कर्जत-जामखेडमध्ये राबविण्यात आला आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *