मोठी बातमी - आलमगिरचा कचरा प्रश्न कधी सुटणार ?

News24सह्याद्री -
कचऱ्याने अनेक गावांचे आरोग्य धोक्यात आणले असून दिवसन्दिवस कचरा प्रश्न पेटत चालला, आहे छोट्या गावा पासून ते मेट्रो सिटी पर्यंत कचऱ्याच्या प्रश्नाने सर्वांना चांगलेच सातवाले आहे नगर शहारा जवळच असलेल्या नागरदेवळे या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणार्या आलमगीर परीसरात सध्या कचरा जाळल्या मुळे अजाऊबाजूच्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, कचरा डेपोला जागाच नसल्याने आलमगीर परिसरात कचरा आणूंन टाकला जातो आणि मग हा कचरा जाळला जातो या कचरा जाळल्यामुळे धुराचे लोट तीन चार दिवस सुरु असतात आणि या मुळे अजुबाजूच्या नागरिकांना श्वास घेण्यासही त्रास होते मात्र या याबाबत ग्रांमपंचात काहीच कार्यवाही करत नाही असा आरोप या भागातील नागरिकांनी केला आहे.
आलमगीर परीसरात कचरा जाळणे नित्यनियमाचे झाले आहे मात्र याला कुठे तरी प्रबंध घालणे जरुरीचे आहे तर या प्रश्ना बाबांत ग्रामपंचायत सदस्य फिरोज पठाण यांच्याशी आमचे कार्यकारी संपादक सुशील थोरात यांनी फोनवरून संपर्क साधत या कचरायच्या प्रश्नाविषयी प्रतिक्रिया घेतलीय ती पाहुयात.
नागरदेवळे ग्रामपंचायतीचे सरपंच राम पानमाळकर यांच्याशी हि संपर्क केला असता त्यांनी आपली हतबलता बोलून दखवली भिंगार छावणी मंडळ त्यांच्या कचरा डेपो मध्ये कचरा टाकू देत नाही तसेच नगर शहर हद्दीत तोच प्रश्न येतो आणि ग्रामपंचायतीच्या खुल्या जागेवर नागरिक कचरा टाकू देत नाहीत त्या मुळे सर्व ठिकाणावरून कात्रीत सापडलेल्या नागरदेवळे ग्रामपंचायतीला आता जिल्हापरिषद प्रशासनकडूनच अशा आहे अशी प्रतिक्रिया सरपंच राम पानमाळकर यांनी दिलीय .
कचरा जाळणे आणि प्रदूषण करणे हा गुन्हा आहे मात्र या कडे साफ दुर्लक्ष करत आलमगीर भागात कचरा पेटवून दिला जातो आणि या प्रकाराकडे ग्रामपंचायत सोयीस्कर दुर्लक्ष करत आहे ग्रामपंचायत आणि जिल्हापरिषद प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लवकरात लवकर लक्ष देऊन हि समस्या सोडवणे गरजेचे आहे नाहो तर हि कचरा जाळण्याची समस्या भविष्यात आलमगीर येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात अनु शकते आणि एक मोठी समस्या बनू शकते.
No comments
Post a Comment