Breaking News

1/breakingnews/recent

25 डिसेंबर सह्याद्री बुलेटिन

No comments

        News24सह्याद्री - राज्यातील ६४ लाख विद्यार्थी आधारपासून निराधार...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES


1. महाराष्ट्रात नाईट कर्फ्यू नेमका कशासाठी? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर
आपल्याला बंधनांची आवश्यकता आहे. दिवसा आपण लॉकडाउन करु शकत नाही. तशी वेळही येऊ नये. निदान रात्रीची संचारबंदी आहे म्हटल्यावर त्यांना धोक्याची जाणीव होते. अनावश्यक गर्दी टाळणं हे जास्त महत्वाचं आहे”

2. वसईत नाताळ साधेपणाने
 संभाव्य धोका ओळखून सर्व चर्चनी अनेक निर्बंध घातले आहेत. ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली असली तरी यंदा हा सण अत्यंत साधेपणाने साजरा होईल. 

3. अमरावती विद्यापीठाच्या ताणावर विभाजनाची मात्रा

पश्चिम वऱ्हाडातील तीन जिल्हय़ांसाठी अकोल्यात स्वतंत्र विद्यापीठ उभारण्याची मागणी गत दीड दशकांपासून रेंगाळली आहे. त्यातच आता केंद्रीय विद्यापीठाच्या मागणीनेही जोर धरला. अकोल्यात नवे विद्यापीठ अस्तित्वात आल्यास गुणवत्तापूर्ण शिक्षण व संशोधनाची वेगळी सुविधा निर्माण होईल.  

4. पालकांना विचार करण्यात भाग पाडणारी घटना.  
शुल्लक अशा गोष्टीवरून खून करण्यापर्यंत या लहान मुलांची हिम्मत तरी कशी होत आहे याबाबत सर्वच पालकांना विचार करणं गरजेचं झालआहेय,नाहीतर पुढे चालून मुलांची क्रूरता वाढून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पालकांनो आपल्या बालकांना वेळीच आवरायला हवं..

5. सलग सुट्ट्या, त्यात नवी अट; ग्रामपंचायत इच्छुंकापुढे नियमांची कटकट
सलग सुट्ट्या, त्यात नवी अट; ग्रामपंचायत इच्छुंकापुढे नियमांची कटकट ग्रामपंचायत निवडणुकीचं पडघम वाजलं असली तरी ग्रामपंचायतीच्या मैदानात शड्डू ठोकलेल्या उमेदवारांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे.

6. शहरी भागात नवीन रेशन दुकाने स्थगिती उठवणार-छगन भुजबळ 
शहरी भागात नवीन दुकानांना देण्यात आलेली स्थगिती आदी विविध विषयांसदर्भात मंत्रालयात आढावा बैठक झाली, यावेळी भुजबळ यांनी ग्रामीण भागात महसुली गावांना लोकसंख्येच्या प्रमाणात नवीन रास्त धान्य दुकाने मंजूर करणे तसेच रद्द करण्यात आलेल्य दुकानांसाठी जाहीरनामे काढण्याचे निर्देश दिले.  

7. पुणे मनपा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादीची खेळी,भाजपचा आरोप
ग्रामपंचायतींच्या नोंदवह्यांत फेरफार होऊ नयेत, या उद्देशाने ही कार्यवाही करण्यात येणार आहे. नवीन बांधकामे, मोकळ्या जागा, त्यावरची आरक्षणे याबाबी तपासल्या जाणार आहेत. गावांमधील प्रशासकीय कामांसाठी वरिष्ठ अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे.

8. इन्फोसिस, रिलायन्स ठरल्या सर्वांत वेगवान कंपनी
कोटक महिंद्रा ही सुद्धा अव्वल अष्टपैलू वेल्थ क्रिएशन कंपनी असल्याचा निष्कर्ष मोतीलाल ओसवाल फायनान्सियल सर्व्हिस विमिटेडच्या नव्या अहवालतून काढण्यात आला आहे. मोतीलाल ओसवाल फायनान्सियल सर्व्हिसेस लिमिटेडन 25 व्या वार्षिक वेल्थ क्रिएशन स्टडी, 2020 ची घोषणा केली आहे
.  

9. राज्यातील ६४ लाख विद्यार्थी आधारपासून निराधार
त्याचबरोबर काही अस्तित्वात नसलेले आधार क्रमांक नोंदणी झाल्याचे प्रकार समोर आले होते. या सर्व बाबींवर आळा घालण्यासाठी सर्व विद्यार्थी आधार क्रमांक नोंदवून त्याची खात्री होणे आवश्यक आहे. त्यामुळे शिक्षण विभागाने आधार नोंदणी आणि अद्यावतीकरण आवश्यक केले आहे.  

10. दिल्लीत धावणार चालकरहित मेट्रो, मोदी दाखविणार हिरवा कंदील
 डिसेंबर अखेरी ही मेट्रो सुरु होईल असे अगोदरपासून सांगितले गेले होते मात्र त्याची अधिकृत घोषणा आत्ता केली गेली आहे. जनकपुरी वेस्ट ते नोईडा बोटॅनिकल गार्डनला जोडणारी ३७ किमी मार्गाची ही मजेंटा लाईन देशातील स्वयंचलित चालकरहित मेट्रो आहे.  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *