अपघात विमा योजनेत 1 एप्रिलपासून मोठे बदल
मुंबई
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने नवी वैयक्तिक अपघात विमा योजना लागू करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील वर्षातील 1 एप्रिलपासून नवी योजना लागू होणार आहेत. आय आर डीए आयने देशातील सर्वसाधारण आणि आरोग्य विमा कंपन्यांना एक वैयक्तिक अपघात विमा योजना तयार करण्याचे आदेश दिले आहेत. या योजनेतील नियम, अटी आणि फायदे सर्व कंपन्या आणि ग्राहकांसाठी सारखेच असणार आहेत. प्रस्तावित योजनेनुसार अपघात विम्याचा लाभ 2.5 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत असेल. अपघात विमा योजनेत मोठे बदल होणार आहे.

No comments
Post a Comment