सह्याद्री ब्रेकिंग न्यूज -ग्रामपंचायत निवडणुकांचा बिगुल वाजला..
News24सह्याद्री -
राज्यात ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा बिगुल अखेर वाजला असून राज्यातील १४२३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. १५ डिसेंबरला तहसीलदारांनी नोटीस प्रसिद्ध केल्यानंतर ह्या निवडणुकांची धामधूम सुरु होईल तर २३ डिसेंबर पासून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात होणार. त्यानंतर १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच १८ जानेवारीला मत मोजणीनंतर गावाचे नवीन कारभारी कोण याबाबत समजेल. दरम्यान ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचे बिगुल वाजल्याने गावाच्या कारभारी पदी आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ सुरु झाल्याचे चित्र आहे. तर राजकीय पक्ष देखील निवडणुकीत आपली ताकद दाखविण्यासाठी रिंगणात उतरल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
No comments
Post a Comment