Breaking News

1/breakingnews/recent

जिल्ह्याची खबरबात - अण्णांचे आंदोलन; भाजपची धावपळ, ठाकरे सरकार सावध

No comments

  News24सह्याद्री - अण्णांचे आंदोलन; भाजपची धावपळ, ठाकरे सरकार सावध....पहा जिल्ह्याची खबरबात





TOP HEADLINES


1. अण्णा, आंदोलन करू नका! - गिरीश महाजन
महाजन यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला ,  आंदोलन न करण्याची विनंती आपण अण्णांना केली आहे. गरज पडली तर, देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न करू, असे महाजन यांनी म्हटलंय .

2. पोपटराव पवारांची सीताफळांची बाग फुलली 
यावर्षी पावसामुळे बहुतांशी भागात पिकांचे नुकसान झाले असले तरी पवार सिता फळांना सेंद्रिय खताचा वापर करतात व व्यवस्थापनाकडे योग्य पद्धतीने लक्ष देतात त्यामुळे नुकसान थांबवण्यात यश आला आहे.

3. निवडणूक तोंडावर आल्याने विकास कामांना  झाली  सुरवात
कार्य्त्तप्र्तेने स्वतहा जातीने लक्ष घालत काम पूर्ण करून घेण्यासाठी नगरसेवकांची  तळमळ सुरु असल्याचे चित्र पहायला मिळत आहे , तर नगरसेवकांची ही बदलती रूप पाहून शेव्गाव्क्र्नही भारावून गेले आहेत .

4. मोबाईल चोर जेरबंद
मोबीन शेख असे या प्रकरणातील आरोपी चे नाव  आहे , स्वप्नील सोनार नामक व्यक्तीचा अठरा हजार रुपये किमतीचा मोबाईल राहता येथून  आरोपी शेख याने चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली,

5. गाव तेथे युवक काँग्रेसची शाखा    
या बैठकीला युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते , यावेळी संगमनेर तालुक्यात सह  उत्तर नगर जिल्हा तील प्रत्येक गावात युवक काँग्रेसची शाखा   स्थापन करण्याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली . लवकरच गाव तेथे  युवक काँग्रेस  ची शाखा  या मोहिमेला सुरुवात होणार आहे .

6. कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
कैलास  नेमाने असं आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्याचं  नाव आहे. कर्जबाजारी पणाला कंटाळून या शेतकऱ्याने  स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या  केली.या दुःखद घटनेमुळे नागरिक  हळहळ व्यक्त करताहेत .

7. एकात्मिक विकास फाउंडेशनच्या रंग व तत्सम साहित्याचे लोकार्पण...
 या साहित्याचा  लोकार्पण कार्यक्रम सुनंदा पवार यांच्या हस्ते नुकताच  संपन्न झाला .तर जामखेड शहर नक्कीच स्वच शहर म्हणून नावारूपाला येईल असा आशावाद पवार यांनी यावेळी व्यक्त केला .

8. मगर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे - नागवडे   
मगर यांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे असून गेल्या तीन वर्षपासून मगर यांनी कारखान्यामध्ये सर्वाना त्रास देण्याची भूमिका घेतली असल्याचा गौप्य्स्पोट नागवडे यांनी केला .

9. जामखेड तालुक्यात आत्महत्यांचे सत्र  सुरूच 
जामखेड तालुक्यात आत्महत्या चे सत्र थांबता थाबेना तालुक्यातील  खर्डा येथील विष्णू बन्सी आहेर या शेतकऱ्याने आत्महत्या केली . खर्डा -  उस्मानाबाद रस्त्या लगत एका  शेतात  लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन या शेतकऱ्याने  आत्महत्या केली , मात्र या शेतकऱ्याच्या आत्महत्या चे कारण समजू शकले नाही . 

10. शिर्डीत प्लास्टिक वापरल्यास दंड व गुन्हा दाखल होईल : मुख्याधिकारी

प्लास्टिक वापरणाऱ्यांकडून  पहिल्या वेळेस rs.5000 तर दुसऱ्या वेळेस दहा हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे,  मात्र दंड करूनही न ऐकल्यास गुन्हा दाखल  केला जाणार आहे . 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *