सह्याद्री ग्राउंड रिपोर्ट - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळेचा पहिला दिवस
News24सह्याद्री -
राज्य सरकारच्या परवानगीनंतर राज्याच्या ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयांमधील नववी आणि बारावीच्या वर्गांना आजपासून प्रारंभ झाला. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आणि औरंगाबादसारख्या शहरांमध्ये शाळा सुरु होणार नाहीत. ग्रामीण भागात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे अहमदनगरसह सोलापूर, रत्नागिरी, यवतमाळ, गडचिरोली, बुलढाणा, गोंदिया, वाशिम आणि अमरावतीमधील शाळा आजपासून झाल्या आहे.
शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये अनेक शिक्षक कोरोनाबाधित असल्याचं आढळून येत आहे. त्यामुळे शिक्षक, पालक संघटनांकडून शाळा सुरु करु नये अशी मागणी करण्यात येत आहे. तर शाळा सुरु करण्याबाबतचा अंतिम निर्णय स्थानिक प्रशासनाकडे सोपवण्यात आला आहे.
कोरोनाचा दुसरा टप्पा येण्याच्या मानसिकतेने पालकांसह शिक्षकही धास्तावलेले दिसत आहेत. मात्र, असे असले तरी फिरोदिया प्रशालेचे कामकाज सुरू झाले आहे. विद्यार्थ्यासह शिक्षकांची पूर्णपणे काळजी घेतली असल्याचा दावा फिरोदिया प्रशालेने केला आहे.
No comments
Post a Comment