जिल्हा बँक निवडणुकीचा मार्ग मोकळा
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjHXfM_IOaDMU4B5qO3eu5CDmNOZ04BFmxR2lft6pA8mQRGULBaGy2ijeMBmiXiiDM7wgaxo462bPvhrCbd9TE78PKsmbfwzyV-Qlvk_oM4d5PAeOATUic1dLA5w4PGJGfiwGyAOtIe3v0/s320/bank.jpg)
शासनाचा निर्णय खंडपिठाकडून रद्द
अहमदनगर । नगर सह्याद्री - जिल्हा बँकेसह विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांच्या निवडणुका 3 महिने पुढे ढकलण्याचा राज्य सरकारचा निर्णय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्द ठरवला आहे. सहकारी संस्थाच्या निवडणुका तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय असंवाधैनिक असल्याचे म्हटले आहे. या निर्णयामुळे जिल्हा सहकारी बँक व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
हा निर्णय औरंगाबाद खंडपिठाचे न्या. एस. व्ही. गंगापूरवाला व न्या. एस. डी. कुलकर्णी यांनी दिला. अशी माहिती याचिकाकर्त्यांचे वकिल अॅड. नितीन गवारे यांनी नगर सह्याद्रीशी बोलताना दिली.
No comments
Post a Comment