औरंगाबाद नामांतराच्या मुद्द्यावरून उदयनराजे यांची शिवसेनेवर टिका
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjwNroC6oo_tIiQ7_85i9korwZq4Ax-FyfJsfFfOccIglzdoOo9ssCzwkOg0GwGe7GBn9GTafznA-kY6TdZGzG0tnpBtD5PmbIbr_xFRAMz8xOSVjA59fOkeu0WCCnkqV6iop3lg60vz_Y/s320/uddhav-thackeray-udayanraje-bhosale.webp)
मुंबई -
सध्या राज्यभर औरंगाबाद नामांतराचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. शिवसेनेकडून औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्याचा घाट सुरू असतानाच सत्तेतील मित्रपक्ष कॉंग्रेसने मात्र त्यास तीव्र विरोध केला आहे. यावरून राज्यातील महाविकास आघाडीतच ठिणगी पडली असून विरोधी पक्ष भाजप सत्ताधाऱ्यांना घेरण्याचा प्रयत्न करीत आहे. दरम्यान भाजप नेते आणि खासदार उदयनराजे भोसले याना या मुद्द्यावरून विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे. औरंगाबाद च्या नामकरण प्रकरणावर खा.उदयनराजे भोसले म्हणाले ही लोकशाही आहे इथे जनता निर्णय घेत असते. आपण पाहतो बॉम्बे च मुंबई झाले तसे लोक निर्णय घेतील या बाबत मला काय वाटत या पेक्षा लोकांनी निर्णय घ्यावा राजेशाही असती तर मी निर्णय घेतला असता असे ते म्हटले आहे.
दरम्यान, उदयनराजे भोसले यांना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशी सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे या बाबत त्यांना विचारले असता त्यांनी त्यांच्या स्टाईल ने या प्रश्नाचे उत्तर देत माझे मंत्रिमंडळ मीच निवडतो तसेच कुणीही मला मंत्री करू शकत नाही माझे मित्रच माझे मंत्रिमंडळ आहे आणि तेच माझें कॅबिनेट आहे.अशी मिश्किल टिपणी त्यांनी या वेळी बोलत असताना केली आहे.
यावेळो उदयनराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ही टोला लगावला आहे. सध्या मुख्यमंत्री विदर्भ दौऱ्यावर आहेत त्यांच्या या दौऱ्या बाबत विचारले असता चांगले आहे ते लोकांमध्ये फिरतायत फिरल पाहिजे लोकांमध्ये मिसळले पाहिजे ते माझे चांगले मित्र आहेत त्यांनी फिरावे पण लोकांना फिरवू नये असा उपरोधक टोला यावेळी उदयनराजे भोसले यांनी लगावला आहे.
No comments
Post a Comment