Breaking News

1/breakingnews/recent

जयंत पाटील यांनी पत्र लिहून महामानवाला केले अनोख अभिवादन

No comments



मुंबई -

 जयंत पाटील यांनी बाबासाहेबांना पत्र लिहून अभिवादन केले आहे.भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून अभिवादन केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.मात्र, बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जयंत पाटील यांनी वेगळे माध्यम निवडले आहे.देशभरातील कोरोनाचे संकट कमी झाले नसल्याने यंदा आम्ही घरूनच आपल्याला अभिवादन करत आहोत.तुम्ही घालून दिलेल्या विचारांचे आजही आम्ही पालन करत आहोत. 

म्हणून देश हितासाठी आपल्या महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमीवर गर्दी न करण्याच्या सरकारच्या आवाहनला चांगला प्रतिसाद मिळत आहे.आमचे सरकार संत गाडगेबाबांच्या विचारांनी प्रेरित आहे. इथल्या रंजल्या गांजलेल्यांच्या उन्नतीसाठी, उपेक्षित, वंचितांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव कार्यरत राहू. महाराष्ट्राचा वारसा असलेल्या पुरोगामी विचारांना तडा न जाऊ देता समता, न्याय, बंधुता या मूल्यांचे आम्ही रक्षण करू.चैत्यभूमी ही आम्हा सर्वांचीच उर्जास्त्रोत आहे, इथली माती आम्हाला नेहमीच उर्जा देत राहील याचा मला विश्वास आहे. महापरिनिर्वाण दिनी तुम्हाला विनम्र अभिवादन!


आपला,

जयंत पाटील

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *