सह्याद्री स्पेशल रिपोर्ट - मोदी सरकारचा नवा प्लॅन; या नियमांचं पालन केलं नाही, तर रद्द होईल गाडीचं रजिस्ट्रेशन
News24सह्याद्री -
केंद्र सरकार एका नवीन प्लॅनची आमलबजवानी करण्याच्या विचारात आहे , ज्यानुसार सरकारकडून 2021 पर्यंत प्रदूषण पसरवणाऱ्या वाहनांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्याची योजना आखली जात आहे. यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने ड्राफ्ट नोटिफिकेशन जारी करून, सर्व संबंधितांकडून सूचना मागवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय सरकार प्रदूषणाची तपासणीही ऑनलाईन करण्याचा प्लॅन करत आहे. एका अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली आहे. या नव्या प्लॅनिंगनंतर प्रदूषण चाचणी केंद्र, प्रदूषण प्रमाणपत्र, वाहन मालक आणि वाहनाची माहिती राष्ट्रीय मोटर वाहन रजिस्टरमध्ये उपलब्ध होईल. यामुळे कोणीही खोटं प्रदूषण प्रमाणपत्र मिळवू शकत नाही. दरम्यान सरकारच्या नव्या प्लॅनिंग आणि नियमांनुसार, वाहन मालकांना प्रत्येक सर्व्हिसनंतर प्रदूषणाची तपासणी करावी लागेल.
तर मोटर वाहन इंस्पेक्टर इलेक्ट्रॉनिक लिखित रुपात प्रदूषणाच्या तपासणीचे आदेश देतील .या आदेशानंतर 7 दिवसांत Pollution Under Control Certificate अर्थात PUC सर्टिफिकेट घ्यावे लागेल. असं न झाल्यास वाहनाचं रजिस्ट्रेशन रद्द केलं जाईल.ऑनलाईन प्रदूषण तपासणीत वाहनाच्या मालकाचा मोबाईल नंबर डेटाबेसमध्ये एंटर केला जाईल. त्यानंतर वाहनाच्या मालकाला एक ओटीपी पाठवला जाईल. ओटीपी एंटर केल्यानंतर प्रदूषण तपासणी फॉर्म ओपन होईल. यात प्रदूषणाची पातळी ठरलेल्या मानकाहून अधिक उत्सर्जित झाल्यास, कंप्यूटरद्वारे रिजेक्टची रिसीट येईल. अशाप्रकारच्या प्रोसेसमुळे प्रदूषण तपासणी केंद्रात कोणतीही हेराफेरी होऊ शकत नाही. त्यामुळे आता वधनधारकांना सतर्कता बाळगावी लागणारे आहे.
YOU MAY ALSO LIKE
Thane
No comments
Post a Comment