महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडही भाजपच्या हातातून गेलं
![](https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj781VN2eusMoW2vDdD209csNf2wmFPO6aI4pyjmSbAIslYiTWrfiHhdG8I2_WzK_qo3Q5nVOKMyQqNv73liBAmAuAuq_pXpXxE9RD5quO9vjlxRfKXTfbQqxBJavUpeH_1DiDm08YYQC8/s320/bjp-800x500-1.jpg)
नवी दिल्ली :
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या कलांनुसार भाजपच्या हातून हे राज्य गेल्याचं दिसत आहे. झारखंड मुक्ती मोर्चाच्या नेतृत्त्वातील आघाडी झारखंडमध्ये सत्तेत येत आहे. अंतिम निकाल असाच राहिला तर महाराष्ट्रानंतर आणखी एक राज्य भाजपच्या हातून जाणार आहे. मार्च २०१८ मध्ये २१ राज्यात भाजपा किंवा मित्रपक्षाचं सरकार होतं. पण डिसेंबर २०१९ येईपर्यंत हा आकडा १५ वर आला आहे. गेल्या एका वर्षातच भाजपने ४ राज्य गमावले आहेत. झारखंड हे पाचवं राज्य ठरण्याची शक्यता आहे.
No comments
Post a Comment